सोमवार, ३० जानेवारी, २०१२

वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल........

वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडेल
याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता
त्या दिवसात रोजच, दिवाळी पाडवा होता
जेव्हा रडत होते , तेव्हा मैत्रीनेच हसवलं
नुकतच हसायला शिकले , आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं
चुक तुझी ही नसावी, किंवा माझी ही नसावी
काय सांगावं आपल्या, दैवातच खोट असावी
कारणा शिवाय दुरावले , याचच वाईट वाटतं
रडून रडून शेवटी, डोळ्यातलं पाणी आटतं
विसरुन सारं दु:ख, मी मनाला हवं आवरयला मला माहितीय
मी परतनार असेल तर, तू तयार आहे सावरायला
मी परते पर्यंत तू माझी वाट पाहशील
आत्ताच काय ? अजन्म मी तुजी आणि तू माझाच मित्र राहशील
जपुन पावलं टाकत जा, चुकुनही घसरु नकोस
भेटलो नाही कधी , तरी मला विसरु नकोस
वाटलं नव्ह्तं खरचं, कधी असं घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडे

स्वप्नं-पक्षी ....


एक शब्द मोती झाला,
भावनेच्या शिंपल्यात बंद झाला;

एक शब्द अश्रू झाला,
पापणीच्या काठावरच तिजुन गेला;

एक शब्द सूर झाला,
हृद याच्या तारा छेडीत गेला ;

एक शब्द उचावास झाला ,
निश्वासाचे नाते तोडून गेला ;

एक शब्द उद्वेग झाला ,
मनाच्या बंधनात बंदिस्त झाला ;

सारेच  शब्द पक्षी झाले ,
मनावकाशात विरुनी गेले ...........