तू येतोस तेव्हा
डोळे तुझ्याकडेच पाहत राहतात
विसरतात ते सगळ भोवतालच जग
अन शब्दही तुझेच होऊन जातात
तू येतोस तेव्हा
दिशा साऱ्या रंगून जातात
चंद्रही होतो पोरका
अन चांदण्य स्तब्द होऊन जातात
तू येतोस तेव्हा
फुलेही ( कळ्या ) मोहरून जातात
विसरतात ते मीपण आपल
मनमोहून उजळून जातात
तू येतोस तेव्हा
वाराहि तुला स्पर्शन्यास आतुरतो
तुझ माझ प्रेम पाहून
तोही स्वताला विसरून जातो
तू येतोस तेव्हा
मन हे वेड भारावून जात
मग मीही माझी नसते
तुझ्यात स्वताला सामावून घेत
पण तू नसताना
जीव तुझ्या भेटीला व्याकूळ होतो
माझ्यातली मीच हरवून जाते
तुझ्या विऱ्हाटला एक-एक क्षण
मग तुझ्याविना मी आधुरी आहे
हे भासवून जातो...............