मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

माझं मन .......


कधी कधी आभाळ उगाचच भरून येत
बरसणाऱ्या धारा पाहून मन भरून येत
ओथंबून वाहते पाणी आणि मनातील भावना
काळ्या काळ्या ढगांना त्या नाही मिळत कुठे किनारा
आयुष्य आहे साधे सरळ जगायचे म्हणून जगावे
उगाचच नाही त्याला मार्गी लावावे
त्याचा रस्ता त्याला माहित असतो
आपण तर उगाचच त्यला दिशा दाखवत असतो
तो जात असतो सरळ मार्गी पण
आपण त्याला ओढत असतो प्रेमाच्या मार्गी
तो हि बिचारा येतो आपल्या मागे आणि मग ................
फसतो ,हरतो, आणि स्वताशीच हसून आभाळा कडे पाहतो
सरळ मार्ग सोडून प्रेमाच्या मार्गी का आणल म्हणून
देवालाच ओरडतो पण त्याला तरी काय माहित,
त्याच तिथे जन हे त्याच त्यांनाच ठरवलेलं
आणि त्याच्या त्या चुकीच्या निर्णयावरच तर आभाळ भरून आलेल ..............