बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

सूर गवसला ....


ओला सुगंध श्वासात भरुन
मन स्वच्छंदी पाखरु होते
धुक्याच्या पटलाआडुन हळुच
ढगांना स्पर्श करीत........
नदीसवे मग खळखळुन हसते
कधी भीजलेल्या पाऊलवाटांवर
पडत सावरत मुक्त भटकते
तर कधी हिरवळीच्या गालीच्यावर
शांत पहुडते........
सरसरणा‍‍र्‍या सरींसोबत फेर धरुन
चिंब भिजते........
त्याच क्षणी माझे मन
मला हरवुन गवसते.....

तुझ्या विना मी अधुरी ....


चंद्राविना ते चांदणे अधुरे आहे .
तुझ्या मैत्रीविना आयुष्याच अधुरे आहे 
तुझ्यासंगे जगताना सुखाचा अर्थ कळतो .
जगताना तुझ्यासंग माझ्या आयुष्याला अर्थ मिळतो 
कसे जुळले हे अनामिक बंध 
आहे त्याला प्रामाणिक प्रेमाचा गंध 
हे दिवस असेच राहावे वाटतात ....
पण क्षण कसे फुलापाखारांप्रमाणे क्षणात उडून जातात ...
हातात आठवणींचे मोरपीस ठेऊन जातात ...
येण्याने तुझ्या आयुष्य भरून राहिलंय ...
आता त्या देवाकडे मागण्यासारखे काही न राहिलंय ...
एकाच मागते हे परमेश्वरा ...
सुखी ठेव नेहमी त्याला ...
वाटेतली दुख हवे तर दे मला ...

गोड नाते हे जन्मांतरीचे —


एक मी एक तू,
शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू
साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू
साऱ्यात तू

पंख लाऊनी, उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझी मी माझा तू , कधी केंव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रीत ही, हे स्वप्न नवे

या भोवताली, काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, काही बाकी उरेना
होतो कुठे अन, आलोतं कोठे
रस्ता कुठे जाई कसा, काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे —

माझा श्वास फक्त तुझासाठी .......

तुला न पाहता तुज्यावर ठेवलेला विश्वास
तुला न पाहता तुझा धरलेला हात,
आयुष्यात कधीचं सोडणार नाही..
माझ्या न कळतच माझ्या मनाने
तुझ्यासोबत जोडलयं ह्रदयाचं नातं,
जोपर्यंत जीवात जीव आहे ,श्वासात श्वास आहे ,
तो पर्यंत तर सगळेच जगतात , पण मी जगते
तुझा माझ्यावर असलेल्या विश्वासावर,
माझ्यावर असलेल्या प्रेमावर जो पर्यंत ते आहे
तो पर्यंत मी मरणार नाही
मरेपर्यन्त तरी तुला विसरणार नाही.

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

कळेल का कधी मला ???


तुझ्याशी बोलाव अस नेहमीच 
वाटत मला,
कितीही बोललं तरी बोलतच
रहावस वाटत मला !

तू भेटावास असही वाटत मला
भेटलास कि तुझ्या त्या 
हसऱ्या डोळ्यांत झोकून
द्यावास वाटत मला !

तुझ बोलन कधी खोडकर तर
कधी अजमावाल्यासारख .
तुझ बघण कधी मिश्कील,
कधी अंतरीचा ठाव घेतल्यासारख !

आनं तुज ते हसण
निखळ, निर्मल मनालाच 
प्रतिबिंबित केल्या सारखं
असं तू नेहमीच हवाहवासा वाटतोस,
वेड्या ह्या मनाला !

मनं पाखरू .....


ओला सुगंध श्वासात भरुन
मन स्वच्छंदी पाखरु होते
धुक्याच्या पटलाआडुन हळुच
ढगांना स्पर्श करीते ........
नदीसवे मग खळखळुन हसते
कधी भिजलेल्या पाऊलवाटांवर
पडत सावरत मुक्त भटकते
तर कधी हिरवळीच्या गालीच्यावर
शांत पहुडते........
सरसरणा‍‍र्‍या सरींसोबत फेर धरुन
चिंब भिजते........
त्याच क्षणी माझे मन
मला हरवुन गवसते.....

तुझी आणि माझी नव्यानी भेट ...



तुझी आणि माझी नव्यानी भेट 
खूप सारे प्रेम आणि छोटीशी तक्रार 
समज गैरसमज मधून नाते झाले तयार 
कधी आता नाही घेणार माघार 

खूप खूप प्रेम करू बजावले एकमेकांना 
नाही रुसयाचे नाही फुगायचे
नाही भांडायचे समजावले आम्ही स्वताला 

तुझी मी होईन मैत्रीण तर कधी तू माझा मित्र 
तू नको भोगुस आता दुःख आणि कष्ट 

पण.... लक्षात ठेव आयुष्यभर 
मला देखील नाही तुझ्याशिवाय कुणाची आस 
तूच माझा आधार आणि तूच माझा श्वास

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

निशब्द प्रेमाची गाथा...

स्वःताहून जास्त प्रेम तुझ्यावर केले होते मी,
माझे सर्वस्व अर्पण केले होते मी..
तुझा भास, तुझा सहवास,
तुझ्याचं प्रेमात पडले होते मी..
नाही कधी मिळाले मला काही,
ना मिळाले काही मला आजहि ..
स्वप्न रंगवत होते आपली एकांतात ,
पण ?????
स्वप्नांतील रंगचं नाहीसे झाले आज..
खूप ठरवले होते मी स्वःताशीचं,
नाही पाहणार तुझ्याकडे कधीचं..
पण ?????
प्रेम होते तुझ्यावर आधीचं,
संपणार नव्हते ते आज व कधीचं..
आज तू मला सोडून गेला होतास
काळीज माझे काढून निघून गेलास
मरण सुद्धा माझ्या नशीबात का नव्हते,
आयुष्याचे चित्र रंगहीन करून गेलास
तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास ..
मला विसरून जा म्हणालास
मग का माज्या चीत्तेवर माझ्यासाठीचं रडलास ?????

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं......

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात......
 कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
मनातील भावना मनातच राहतात 
शब्द बर्फागत मुखातच थिजतात 
गोठलेल्या शब्दातून त्या मग 
मूक वचने बाहेर येतात 
कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
काय सांगावं काय नको 
या विचारात रात्र सरुनी जाते
तेजाच्या पहिल्या किरणाने 
नव्या दिवसाची चाहूल लागते 
कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
नव्या उमेदीची, नव्या  नात्यांची , नव्या आयुष्याची 
गुंतागुंत तुज सवे सोडवावीशी वाटते 
गुंतलेल्या त्या नात्यांमधून बाहेर पडावेसे वाटते 
बंदिस्त त्या आयुष्यातून मुक्त उडावेसे वाटते 
कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
सोन्याच्या पिंजर्यातील तडफडणाऱ्या पोपटागत
बंदिनीच्या लाभलेल्या आयुष्यातून  
दूर कुठे तरी ऊंच आभाळात संचारावेसे वाटते 
बस कित्येकदा तुला  हेच सांगावेसे  वाटतं
एवढेच सांगावेसे वाटते ......... 

न त्याला कळावे न मला कळावे .....


असाव कुणीतरी माझ्या मनाचं वेध  घेणार 
न काळात माज्या मनातील भावनांना भेदणार 
प्रवेश  त्याचा मनाच्या अंतरित व्हावा 
न त्याला कळावा न मला कळावा
एकमेकांच्या मनातले नकळते भाव एकमेकास कळावे 
जणू जादुई नगरीत स्वताचे स्वप्न हरवावे 
भावनांच्या गाठोड्यात गुंताव्या त्याच्याही भावना 
त्याच्या ध्येयात साकार व्हाव्यात माझ्या कल्पना 
न कळत त्याच्या नि माज्या मनाची गुंतागुंत व्हावी 
न त्याला कळावी न मला कळावी 
नितळ प्रेमाचे नितळ मैत्रीचे 
असे हे नाते आयुष्यभराचे 
जगावे दोघांनी फक्त एकमेकांसाठी 
न त्याला कळावे न मला कळावे 
मांजरी सारखे डोळे मिटून दोघांनी प्रेम करावे 
कुणी पाहत नाही अस समजत असताना सर्व जगाने ते पाहावे 



शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

मी आभारी आहे ….

मी आभारी आहे
तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग त्याला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अंगण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांची सौदागर म्हणून जगले सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हि निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे

तू येतोस तेव्हा......



तू येतोस तेव्हा
डोळे तुझ्याकडेच पाहत राहतात
विसरतात ते सगळ भोवतालच जग
अन शब्दही तुझेच होऊन जातात

तू येतोस तेव्हा
दिशा साऱ्या रंगून जातात
चंद्रही होतो पोरका
अन चांदण्य स्तब्द होऊन जातात

तू येतोस तेव्हा
फुलेही ( कळ्या ) मोहरून जातात
विसरतात ते मीपण आपल
मनमोहून उजळून जातात

तू येतोस तेव्हा
वाराहि तुला स्पर्शन्यास आतुरतो
तुझ माझ प्रेम पाहून
तोही स्वताला विसरून जातो

तू येतोस तेव्हा
मन हे वेड भारावून जात
मग मीही माझी नसते
तुझ्यात स्वताला सामावून घेत

पण तू नसताना
जीव तुझ्या भेटीला व्याकूळ होतो
माझ्यातली मीच हरवून जाते
तुझ्या विऱ्हाटला एक-एक क्षण
मग तुझ्याविना मी आधुरी आहे
हे भासवून जातो...............

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

"आयुष्य"


"आयुष्याला शब्दात मांडन अशक्य असत ..
किती ही मांडन्याचा प्रयत्न केला तरी ते अपुरच असत ...

आयुष्य आयुष्य असत...
त्यात जे व्हायच असत ते होतच असत ...
आयुष्य हे बऱ्याच नात्यात गुंतलेल असत ...
जे सोडवता सोडवत तर नाहीच पण अधिकाधिक गुंतत असत ...

आयुष्य नेमक काय ? हे खर तर कुणालाच कळत नसत ..
आणि कुणाच्या कितीही जोर लावला तरी ते पाहिजे तस वळत नसत ...

तरी हे भाबड मन, त्याला ओळखन्याच्या प्रयत्नात असत ...
नेहमी कधीही न सुटनाऱ्या कोड्याला सोडवत असत ..."

ओंजळभर नात.........


ओंजळभर नात तुझ्या नी माझ्या मैत्रीचं,
ओंजळभर नात आपल्यात रुजलेल्या प्रेमाचं,

या ओंजळीला हात तुझे नि माझे,
या विश्वाचे आपणच राणी नि राजे,

खूप विश्वासाने ओंजळ हि भरलेली,
बिना लग्नाची जणू नवरी नटलेली,

सावरलीस तिला जस बाळ नवं जन्मलेलं,
सुरवंटाचे फुलून फुलपाखरू जाहलेल,

तुझ्या खांद्यावरून उंच भरारी तिची होती,
आभाळात नव्हे तुझ्यातच सामावलेली,

काय झाले अचानक असे जे मीच बिथरली
त्या थरकापाने ओंजळ माजी सुटलेली

वाहून गेले कधी नाते, तेही लक्ष्यात न आले,
माज्या एका चुकीमुळे होत्याचे नव्हते झाले,

ज्या भरवसाने ओंजळ धरलेली,
मिटण्या ऐवजी ती उघड्यावर पडलेली,

भान येताच जागी जेव्हा कर पाहिलेला,
हारून स्वतःशी ओंजळ प्रेमास मुकलेला

सावरली ती ओंजळ माजी तूच प्रेमाने
साथ हि मागितली तू त्याच हक्काने

पुन्हा एकदा भरली माजी विश्वासाची ओंजळ
पण ठिगळागत दिसली ती भरलेली घागर

विस्कटलेल्या मनातले फिस्कटलेले प्रश्न ........


विस्कटलेल्या मनात फिस्कटलेत कित्येक प्रश्न...
शोधता उत्तर एकाचे ठाकतायंत उभे नवे प्रश्न

झाल्यानंतर चुका वाटतं झाल्याच नसत्या तर
गेल्यानंतर निघून वेळ वाटतं घड्याळाचे काटे मागे सरकवता आले असते तर

घडल्या गोष्टींचा न चुकता होतो पश्चात्ताप
पण ज्याची असते किंमत शून्य

क्षणागणिक स्वप्न आणि मनातच प्रयत्न
दुरावत यश ..कमी पडतायत कष्ट

कधी वाटतात सारे परके तर कधी सारे फक्त माझे
कधी दिसतं स्वार्थी जग तर कधी मन चिंब करणारी मैत्री
वागावं कसं.....बोलावं कसं ....मिळताच राहतात सल्ले ...

विस्कटलेल्या मनात फिस्कटलेत असेच कित्येक प्रश्न...
शोधता उत्तर एकाचे ठाकतायंत उभे नवे प्रश्न

मला पण आता श्वास घेऊ दे ....

मोकलेपणाने एकांतात स्वता साठी विचार करू दे.
खुप झाली दुनियादारी,दुसर्यासाठी जगणं अन मरणं,
आता स्वत साठी पण मरून पहु दे
आता मला सुद्धा माझा श्वास घेऊ दे...............
मला पण जगायचय आता ...पण स्वत: साठी च
राना वनात फ़क्त "मी पण " जपून फिरायचय
कोणी मन दुखवून गेल म्हणून नाही ..
"त्या" कोणाला मनात च नको येऊ दे
मला पण आता माझा श्वास घेऊ दे....
तेच तेच उधललेल्या सागराच्या लाटे सारख सारख बनुन सतत फूटने
आता बंद होऊ दे...
मनाला आता संथ नदीच ..तिथे च स्वत: साठी च थांबलेल पात्र होऊ दे.
ते त्या सागराला हि जाउन नको मिळू दे.
मला पण आता माझा श्वास घेऊ दे.
त्या हिरमुसलेल्या नात्यानी दिलेल्या अणि कधीच न भरणाऱ्या
चिघळलेल्या जखमांचा विसर पडू दे.
थंड हवेतला सुगंध अनभवू दे.
मला पण आता माझा श्वास घेऊ दे
आतल्या आत गुदमर्लेला हुंदका आता ओठाशी येऊ दे .
मनातल विष आता डोळ्यातून पाझरु दे.
जगायचय जगायचय म्हणताना च "काळ" येइल समोर
हात पुढे करेल न् बोलेल चल माझ्या सोबत
तो समोर येण्या आधी जगुन घेऊ दे
आता तरी माझा श्वास माला घेऊ दे....................................

मी म्हणजे नेमकि कोण आहे ???????


डोळ्यात स्वप्ना सामाउन झोपता येत मला,
आठवणींच्या सोबतीने जगता येत मला,
भावनांचा काहूर रोखता येतो मला,
काळजाला जाळून देखील जगता येत मला,
जर, आयुष्य रेखाटून भविष्य घडवत आहे...
खरच संग न रे किती अवघड आहे...मी... मी म्हणजे नेमकि कोण आहे.?????

सांग कशाला आलास तू ???

उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझी मीच एकटी,
सुख किती परी तयात होते,
नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,
जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
गोफ नवा मी त्वरे गुंफला,
धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशाला आलास तू???

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

न कळले कधी, मन झाले तुझे....


न कळले कधी, मन झाले तुझे
न कळले कधी, मन झाले तुझे
श्वास-श्वास हा माझा, तुझ्या अंगाणीची फुले

तुझ्या स्वप्नांचे तारांगण, उमलवत रात्र सरे
नैनाच्या त्या तीरात , रातराणीचा भास उरे

सूर तुझाच, माझ्या रोमातून गाई
माझ्या शांत पापणी खाली थेंबाळून जाई

नको मन माझे व्यापूस, रस्त्यांचे कुणा कुठे नेणे
तू नसताना श्वास ही माझा, मला सहन ना होणे!!!

कधी तू असा अबोल की..


कधी तू असा अबोल की..
वाटते,शब्द द्यावेत तुला उधार,
की,शब्दांचे वादळ तर नसते तुझ्या मनात ?

कधी तू असा बोलका की..
वाटते,तुझ्या शब्दांत वाहून जाईल मी,
की,रित्या शब्दांचे तुझे गुपित मला समजत नाही ?

कधी तू असा शांत की..
वाटते,तुझ्या ह्रदयात विरघळावे मी,
की,वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ?

कधी तू असा अशांत की..
वाटते,चंदन व्हावे मी तुझ्यासाठी,
की,आगीशी संग मी करत तर नाही ?

कधी तू इतका जवळ की..
वाटते,तुझ्या श्वासांचीही चाहुल घेतेय मी,
की,मला तुझ्यावर विश्वास नाही ?

कधी तू इतका दूर की..
वाटते,तुझ्याशिवाय दुनिया माझी रिती,
की,आपल्यातले अंतर मी मोजलेच नाही ?

कधी तू असा..कधी तू तसा..
वाटतो तरीही, मला हवाहवासा,
की,'प्रेमा'च्याच 'प्रेमा'त आहे मी ?

पण तरीही,'तू' मला हवाहवासा..हवाहवासा..

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

आदित्य ......... आयुष्याची एक सुरवात


तुजे नाव म्हणजे सुरवात   ....
नव्या आयुष्याची, नव्या दिवसाची, नव्या जीवनाची ,
तूच माज्या जीवनाचा शिल्पकार ,
तूच या मूर्तीचा मूर्तिकार ,
तुज्या हातूनच घडले माज्या जीवनाचे शिल्प ,
तुज्या शब्दातूनच जगले मी हे आयुष्य अल्प ,
तुज्या नसण्यात आहे माज्या जीवनाचा अंत ,
कारण तुज्या नावातच आहे माज्या जीवनाचा आरंभ ,......

मी .....

स्वप्नाविश्वतली स्वप्न वेडी मी .........
भावविश्वातली भावली मी  .........
कितीही बोलले तरी अबोल मी  .........
कितीही जगले तरी मृत मी  .........
मनाच्या गुंतात गुंतालीली मी  .........
बाहेरील विश्वात हरवलेली मी .........
स्वतातील सत्वाच्या शोधात मी .......
प्रियकराच्या आत्म्यात वसलेली मी  .........
किती रुपात वाटले गेलेली मी  .........
तरीही स्वताच स्वताला अजूनही शोधतेय मी  .........

...एक नविन विश्वास...

कोरड्या झालेल्या ओठांवरुन
हलकेच जिभ फ़िरवली
मान फ़िरवुन ... नजर चोरली...
बहुदा... मनातली चलविचल नकळत लपवली..
''तू... ........................ !!''
ती म्हणाली काल जेव्हा....
झोंबरा वारा अंगावर झेलत ...
तळहातावर फ़ुंकर घालत...
नखाने माती उकरत...
तिने डोळ्यांतुन वाहणारा पुर थांबवत...
'' तुला ना................ ''
ती म्हणाली काल जेव्हा....
दर वेळी नविन अर्थ निघतो
तिच्या ''तू'' ..''तु .. ना'' मधुन
आकलनाच्या बाहेर असतात
त्या कंसातल्या वाक्याचे अर्थ...
मी नेहमीच हतबल तिच्या समोर...
ती जोरदार हल्ला करते ...
स्व:ताच म्हणन पटवुन देते
खर तर ती दुसरी कुणी नसते,
माझ्यातालीच 'मी ' असते...
एक नविन विश्वास...
स्व:ताला ओळखण्याची कुवत
ती नेहमीच मला देत असते...
मला मी परत एकदा नव्याने भेटले
एका नविन आत्मविश्वासाने ....
ती म्हणाली काल जेव्हा....
''यु आर द बेस्ट''

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल........

वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडेल
याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता
त्या दिवसात रोजच, दिवाळी पाडवा होता
जेव्हा रडत होते , तेव्हा मैत्रीनेच हसवलं
नुकतच हसायला शिकले , आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं
चुक तुझी ही नसावी, किंवा माझी ही नसावी
काय सांगावं आपल्या, दैवातच खोट असावी
कारणा शिवाय दुरावले , याचच वाईट वाटतं
रडून रडून शेवटी, डोळ्यातलं पाणी आटतं
विसरुन सारं दु:ख, मी मनाला हवं आवरयला मला माहितीय
मी परतनार असेल तर, तू तयार आहे सावरायला
मी परते पर्यंत तू माझी वाट पाहशील
आत्ताच काय ? अजन्म मी तुजी आणि तू माझाच मित्र राहशील
जपुन पावलं टाकत जा, चुकुनही घसरु नकोस
भेटलो नाही कधी , तरी मला विसरु नकोस
वाटलं नव्ह्तं खरचं, कधी असं घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडे

स्वप्नं-पक्षी ....


एक शब्द मोती झाला,
भावनेच्या शिंपल्यात बंद झाला;

एक शब्द अश्रू झाला,
पापणीच्या काठावरच तिजुन गेला;

एक शब्द सूर झाला,
हृद याच्या तारा छेडीत गेला ;

एक शब्द उचावास झाला ,
निश्वासाचे नाते तोडून गेला ;

एक शब्द उद्वेग झाला ,
मनाच्या बंधनात बंदिस्त झाला ;

सारेच  शब्द पक्षी झाले ,
मनावकाशात विरुनी गेले ...........

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

अंतर त्याचे नि माजे...........



मला आता त्याच्या मध्ये गुंतायचे नव्हते....
खूप प्रेम करत असली त्याच्यावर तरी ,
आता मला ते सर्व काही विसरायचे होते.

खूप प्रेम असूनही त्याच्या बद्दल ,
आता मला ते कधी दाखवायचे नव्हते .
त्याच्यासाठी फुलणाऱ्या कळीला ,
तो फक्त तुझ्यासाठी नाही हे सांगायचे होते ....

माझ्याविना तुझा आयुष खूप सुंदर आहे ,
हे त्याला आता मला पटउन दायचे होते ,

मी जरी तडपणार असले त्याच्या विना ,
तरी मी आनंदी राहील हेच मला सांगायचे होते.

कारण .....
आता मला त्याच्या नव्याने थाटनार्या संसारामध्ये,
डोकावून कधी पाहिचे नव्हते.

त्याच्या आधारासाठी त्याच्या सोबत राहायचे होते पण
त्याच्या संसारात हिस्सेकारी वायचे नव्हते

कसे समजू मी त्या वेड्याला
संसार म्हजे दोन जीवाचे स्वप्न असते त्यात कोना तिसर्याला स्थान नसते

फक्त तुझ्यासाठी...................................


उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
आणि तुझी सावलीही माझ्यासाठी परकी असेल
कस सावरू मी स्वत:ला
तुला स्पर्श करून आलेला वाराही मला बोचणारा असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
माझी मिठी मात्र तुझ्यासाठी आसुसलेली असेल
कस सावरू मी स्वत:ला
तुझ्या बदललेल्या भावनांची नजर
मला छळणारी असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
माझ्या श्वासांना तुझ्या हृदयापासून वेगळ करणारा असेल
कस सावरू मी स्वत:ला
माझ्या हृदयाचा आक्रोशही
तुझ्यासाठी मुका असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल

तुझे नि माझे नाते काय ........


तुझे नि माझे नाते काय ...
कलतानाही कळत नसे ...
तू जेथून चालुनी गेलास ...
तेथे अजुनही पाउलांचे ठसे ...

मी रात्र ना संपणारी ....
तू निवांत वारा मिठीतला ...
चांदण्या टिपून घेता ...
क्षण चांदने झाला ....

तू असा आलास की ....
निसटुनी गेलास का ...
नात्यात बांधुनी मला ....
नात्यात सोडुनी गेलास का ....

नाद तू नात्याताला ...
निनाद ..... ..... भासती शब्दातले ...
तू जे जानले माझ्यातले ...
मी माझे नाते जानले ....

तुझ्या विना................


तुझ्या नी माझ्यातले नातेच मला कळत नाही
तुझा विचार केल्याशिवाय दिवसच माझा वळत नाही

तुझ्या विना मी अपूरी होते
जशी तुझ्या येण्याचीच वाट मी पाहत होते

आयुष्यातील अपुरे स्वप्न
झाले तुझ्या येण्याने पूर्ण

तुझ्या येण्याने आयुष्यातील परके दिवस आता आपले वाटू लागले आहेत
दुर्लक्ष झालेल्या प्रार्थना आता पूर्ण होऊ लागल्या आहेत

तुझ्याविना घालवलेल्या दिवसांची व्यथा मलाच कळते
आणी माझ्या आयुष्यात तुझ्या अस्तित्वाची प्रचिती कलुन चुकले

तुझ्या विना घेतलेला प्रतेक श्वास अपुरा होता
तो देह आता श्वास जणू तुझ्यासाठीच घेत होता

तुझ्या नी माझ्यात अस काय आहे
इतक्या दिवस न वळलेल्या हाताला जणू तुझाच स्पर्ष आहे

सागराचा नि लाटेचा जस नात असाव
तस तुझ नि माझ नात असाव

बस एवढीच इच्छा आहे तुझ्यापाशी
तू पाउस बनून डोळ्यात वाहण्याची
आणी हळवी झाले तर मनात रहाण्याची

अनामिक नात............

अनामिक नात
काही काही प्रश्नांची उत्तर
फार कठिण असतात..
उत्तर माहीत असूनही..
कधी कधी
सगळीच पान..
कोरी असतात..!

काही काही भावना
खरच समजाण्यापलीकडच्या असतात..
समजून उमजूनही..
कधी कधी
पापण्यान आड त्या..
दडवलेल्या असतात..!

काही काही नातीच
अनामिक असतात..
नाव ठेवल कितीही कुणीही..
तरी कश्या अगदी सहज..
रेशमगाठीनी जोडलेली असतात.

उरली नाही आता......



उरली नाही आता
जीवनात कसलीच खंत
तुझ्या पासूनच सुरुवात माझी
तुझ्या पाशीच अंत
तुज्या एका आनंदासाठी
सार दुःख गिळायचं
मी नाही उरले जरी
माझ प्रेम तरी उरवायचं
जगले तुझ्या प्रेमाखातर
प्रेमाखातर मारायचं
मरतानाही एकच इच्छा
तुझ्याच मनात भरायचं

मन वेड......

मन वेड......
मन अजुनी जळत आहे आतल्या आत
मन अजुनी तळमळत आहे आतल्या आत
मनाला ना अजुनी गवसली स्वत:ची वाट
मन दिशाहीन घुटमळत आहे आतल्या आत
मन अजुनी फ़ुल होउनी उमलत नाही
कळी अकाळी गळत आहे आतल्या आत
शब्द देखणे उभे आहे बोट धरुनी वाट
मन वेड पळत आहे सोडूनी स्वत:च हात......

एक भावना मनातली !.......

एक भावना मनातली
पुष्कळ दा ठरवल कि सांगाव तुला
पण धिरच होत नाहि ,
मनातल सार मनातच रहात
ओठांवर कहिच येत नही !
अस कशिकाय हाक देऊ मी ,
सोप वाटतय का तुला ?
मैत्रिची रीत मनातली प्रित
सगळ्याचाच विचार करायचाय मला !

म्हणुनच अपेक्षा करतेय
तुच कही बोलण्याची ,
खर तर मी हि वाट पहातेय
तुला प्रतिसाद देण्याचि !

माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळल्यात ना तुला ,
सगळ्याच गोष्टि सांगता येत नाहित
थोडस समजुन घे नं मला !!!!!

मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

तुच होतास....


हारले आयुष्यात जेव्हा केव्हा,
जगण्याचा दिलासा तुच होतास.

अडखळली कित्येक मनोगते माझी,
एक निर्भिड शब्द माझा तुच होतास.

नाते कोठले हे मनमनाचे,
अंतरी आरपार माझ्या तुच होतास.

सांग खोट कोणती नात्यात या,
शाश्वत सत्य माझे तुच होतास.

कोपर्‍यात आसवे ढाळताना,
मिश्किल हासु माझे तुच होतास.

भांडण जगाशी होत जाऊ दे रे,
माझ्यासाठी वाद माझा तुच होतास.

 "अडखळली कित्येक मनोगते माझी,
एक निर्भिड शब्द माझा तुच होतास."

शरण तुजवाचुन मी न कुणा,
असा कृष्ण  माझा तुच होतास.

आयुष्यभराची मैत्री........


तुझं आणि माझं
नातं किती वेगळं  होतं
म्हटलं तर काहीच नाही
म्हटलं तर सगळं होतं......

क्षुल्लकशा गोष्टीवरून
आपण किती रुसायचो,
राग जरा ओसरला कि
त्या गोष्टीवरच हसायचो....

मी वाट पाहणार नाही
म्हणून तुला वेळेत ये बजावायचे
आणि मग हाच नियम मोडण्यास
मीच पुढे धावायचे .....

 कधी बनून आधार
कधी सावली बनून जगलो,
कधी खूप समंजस
कधी किती खट्याळ वागलो....

भावना शब्द रूप घेतील
त्या आधीच समजून घ्यायचो,
क्षणिक भेटीतून त्या
दिवसभराचे हास्य भरून न्यायचो.....

सोबत एकमेकांची जणू
असंख्य सुखाची खात्री होती,
निस्वार्थ प्रीत ओसंडावी
अशीच आपली मैत्री होती.....

दोन क्षणांचा सहवास तो
अन आयुष्यभराची मैत्री,
आसवांचा पाऊस हा
अन आठवणींची छत्री......

माझं मन .......


कधी कधी आभाळ उगाचच भरून येत
बरसणाऱ्या धारा पाहून मन भरून येत
ओथंबून वाहते पाणी आणि मनातील भावना
काळ्या काळ्या ढगांना त्या नाही मिळत कुठे किनारा
आयुष्य आहे साधे सरळ जगायचे म्हणून जगावे
उगाचच नाही त्याला मार्गी लावावे
त्याचा रस्ता त्याला माहित असतो
आपण तर उगाचच त्यला दिशा दाखवत असतो
तो जात असतो सरळ मार्गी पण
आपण त्याला ओढत असतो प्रेमाच्या मार्गी
तो हि बिचारा येतो आपल्या मागे आणि मग ................
फसतो ,हरतो, आणि स्वताशीच हसून आभाळा कडे पाहतो
सरळ मार्ग सोडून प्रेमाच्या मार्गी का आणल म्हणून
देवालाच ओरडतो पण त्याला तरी काय माहित,
त्याच तिथे जन हे त्याच त्यांनाच ठरवलेलं
आणि त्याच्या त्या चुकीच्या निर्णयावरच तर आभाळ भरून आलेल ..............

आयुष्याची कल्पना ......


आयुष्याची कल्पना
आपल्या दोघांच्या सुंदर आयुष्याची आपण कल्पना
केली होती.
आपल्या प्रेमाला लग्नात बदलण्याची वेळ
आता आली होती.
देवासमोर लग्न करण्याची तुझी
इच्छा होती
सप्तपदी मंगलअष्टकातून आपली
जन्मोजन्मीची साथ होणार होती
वाळूच ते घर प्रत्यक्षात उतरणार होत
आपल्या सुंदर आयुष्याच एक नवं स्वप्न उमलणार होत
आपल्या त्या घरात दोघांशिवाय कोणीही नव्हत
तुझ्या माझ्या प्रेमानेच एक नवं विश्व बनणार होत
सुंदर आयुष्याची स्वप्न तिथे जुळणार होती
नवी नवी वळणे तिथे घडणार होती
तुज्या साथीने मी भविष्याला पाहणार होते पण
त्या पूर्वीच भविष्याला गालबोट लागले होते
तू माझ्याशी प्रतारणा केली होतीस
जणू त्या भावनेन माझे अस्तित्वच संपून टाकल होत

तू येशीन ना??????????


अजूनही मी तुजी वाट पाहतेय, तू येशील ना?................
त्या रम्य स्वप्नात मला परत नेशीन ना?....... .........
प्रीत हि आहे तुझी आणि माझी
जाई आणि जुईच्या फुला सारखी नाजूक
आपल्या प्रीतीचे गाणे आणि गोडवा आहे त्या सप्तसुरातून
एकमेकांना साद घालत हृदयाला भिडणारा तो नाद
आणि त्याला मिळणारी ती पक्षांची चिवचिवाट
तशीच प्रेमाची साद तू पुनः घालशील  का रे ?............
तू मला परत त्या रम्य स्वप्नात नेशीन का रे ?...........
तुज्या  आठवणीत माझी  प्रत्येक रात्र झुरते 
दिवसही त्याच आठवणीत स्वताला संपवतो
 दिवस रात्रीच्या या खेळणे आता मीहि संपत आहे रे
तुला साद घालत जीवन कंठात आहे रे
एकदा तरी माघारी पावलांनी येशीन का रे ?.........
मला परत त्या रम्य स्वप्नात नेशीन का रे?.........
                                             नेशीन का रे ? नेशीन का रे???????????